Kaayguru.Marathi

गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१

मधुचंद्र

लग्नाची पहिली रात्र…
मधुचंद्राची...
हुरहुर ती भेटीची
एकमेकांच्या मिठीत येण्याची
सरिता मिळे सागराला
तशी समर्पणाची…
होती अबोल शांत शांत
डोक्यावरती लफ्फेदार पदर…
अन् बावरलेली नजर
गुलाब फुलांच्या लडी
बसली होती कुरवाळत...
सप्तरंगी फुलांची रांगोळी
पलंगावरती विखुरलेली
कुंतलातील मोग-याचा गंध
दरवळ खोलीभर…
स्पर्श होताच ती
शहारली...अनाहूत लाटेसारखी
न कळे दोहोंना बेधुंद
बुडाले प्रेमसागरा आकंठ…
श्वासाश्वासाला भारुन गेला
रातराणीचा मधुगंध
शहारले रोमरोम अन्
उधानले तन-मन...
हरपले अवघे देहभान ...
अन् चंद्रही लाजला,रात्रीला
चोरुन...होता साक्षीला !
भूप राग पहाटगाणी !
वाराही आळवित आला


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


२३ टिप्पण्या:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे मनाला धुंद करणारी कविता आहे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...