Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर १०, २०२१

व्वाव! अप्रतिम!

[ मानवी वृत्ती... 
प्रत्येकाला वाटते...मला सर्वांनी आपले म्हणावे,मला मान द्यावा,माझ्या लेखनाचे,माझ्या गायनाचे,माझ्या कौशल्याचे सर्वांनी गुणगान करावे.वाहवा करावी.असे वाटते.पण, ज्याच्याकडून अपेक्षा करतो ,त्यालाही आपल्याकडून " अशीच सुंदर अपेक्षा " असते हे आपण हेतुत: विसरतो .खरंय ना? काय वाटतं तुम्हाला ? लिहा! बोला! नक्कीच मनमोकळे व्हा ! प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत! ] 
@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मित्रहो…
मी कोणी दिले काही तर…
सर्वच काही घेतो चाखून

पण…
जेव्हा देतो मी इतरांना काही
तेव्हा खिशात ठेवतो राखून !

करणार तरी काय ?
शेवटी मानवी स्वभावच ना
यालाच म्हणतात मतलब!

अन् मित्रहो !
दुस-याला द्यायचा फक्त सल्ला
कर भला तो होगा मला !

आपण स्वतः मात्र
चकचक चांदणी...वाटोळं दार !
नको जास्त बोलू न् यार…
….दुखतंय की फार !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


२७ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर रचना केली सर ��������

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी बरोबर...प्रत्येकजण कौतुकाचा भुकेला असतो... अगदी बरोबर लिहीलत आपण...🥳👍💐

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी सत्य वचन सरजी कौतुक हे प्रेरणा असते.आगम निर्गम....

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...