Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

नवरात्रोत्सव : देवी स्वरुप :कात्यायनी

🌹 शारदीय नवरात्र: सहावी माळ : 🌹
💎 देवी स्वरुप : कात्यायनी 💎
    
    ऋषी कात्यायण यांनी देवीला आपल्या तपोबलाने प्रार्थना केली की, " हे देवी ! तू माझ्या कन्येच्या रुपात माझ्या घरी जन्म घे! " देवीने ऋषी कात्यायन यांच्या इच्छेनुसार कन्या रुपात जन्म घेतला.
 सर्वप्रथम कात्यायन ऋषींनी देवीची पुजा केल्याने तिचे नाव
 " कात्यायनी " असे झाले.देवी भागवत, मार्कण्डेय पुराण आणि स्कंद पुराणात देवी कात्यायनीची कथा वाचावयास मिळते.
तत्प्रसंगी महिषासूर हा उन्मत्त झालेला होता.त्याने तिन्ही लोकी उत्पात माजविला होता.देवीने उग्र रुप धारण करुन महिषासूराचा वध केला.तिन्ही लोकी आनंद निर्माण झाला. 
 दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख म्हणून
" महिषासुरमर्दिनी " असा केल्याचे सांगितले जाते. 

💎 कात्यायनी देवीचे स्वरुप 

कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.देवीचा अवतार धारण करण्याचा मुख्य उद्देश असूरांचा वध, धर्माची पुनर्स्थापना, धर्मसंरक्षण असल्याचे म्हटले जाते. 
देवीला लाल रंग अधिक प्रिय असल्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान करुन देवीची पूजा,भक्ती करणे फलदायक ठरते.

💎 कात्यायणी देवीचे पूजन

दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश केल्यास अधिक लाभ मिळतो तसेच देवीला गोडधोड नैवेद्यही अधिकच प्रिय असल्याचे म्हटले जाते.म्हणून कात्यायनी देवीला दुध-साखरेचा गोड प्रसाद अर्पण करता येईल. त्रास नाहीसा होईल आणि लाभ होईल.


💎 कात्यायनी देवी पूजनाचे फलित :-

मान्यता आहे कि देवी कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी ३ ते ४ फूलं घेऊन
 " कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
   स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥ "
हा मंत्र १०८ वेळा जप केल्यास व नंतर ही फुलं देवीचरणी अर्पण केल्यास फलदायी ठरते.कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो.श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही देवीचे पूजन केले असल्याचे सांगितले जाते. देवीच्या कृपेने विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते.

[टिप: या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य ऐकीव,श्रवणीय माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

१९ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर ,ऊपयुक्त , माहितीपुर्ण आध्यात्मिक लेख...��������

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...