प्रत्येकाला वाटते...मला सर्वांनी आपले म्हणावे,मला मान द्यावा,माझ्या लेखनाचे,माझ्या गायनाचे,माझ्या कौशल्याचे सर्वांनी गुणगान करावे.वाहवा करावी.असे वाटते.पण, ज्याच्याकडून अपेक्षा करतो ,त्यालाही आपल्याकडून " अशीच सुंदर अपेक्षा " असते हे आपण हेतुत: विसरतो .खरंय ना? काय वाटतं तुम्हाला ? लिहा! बोला! नक्कीच मनमोकळे व्हा ! प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत! ]
@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
मित्रहो…
मी कोणी दिले काही तर…
सर्वच काही घेतो चाखून
पण…
जेव्हा देतो मी इतरांना काही
तेव्हा खिशात ठेवतो राखून !
करणार तरी काय ?
शेवटी मानवी स्वभावच ना
यालाच म्हणतात मतलब!
अन् मित्रहो !
दुस-याला द्यायचा फक्त सल्ला
कर भला तो होगा मला !
आपण स्वतः मात्र
चकचक चांदणी...वाटोळं दार !
नको जास्त बोलू न् यार…
….दुखतंय की फार !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "