Kaayguru.Marathi

श्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१

तुज नमो !

श्री गजाननाय भिमोदराय
उमासुताय   तुज नमो
भालचंद्राय तू गणनायकाय तू
शिवपुत्राय  तुज  नमो
सिद्धवेदाय तू गणाध्यक्षाय तू
शुर्पकर्णाय  तुज  नमो
कांतीदाय तू दिर्घतुण्डाय तू
अव्यग्राय   तुज   नमो
करुणामय तू शरण्याय तू
महाग्रिवाय  तुज  नमो
रत्नसिंहासनाय तू नित्याय तू
मुषकाधिपवाहनाय तुज नमो
अमेयाय तू विकटाय तू
भक्तकल्याणाय तुज नमो
सिंदुरवदनाय तू शांताय तू
एकदंताय  तुज  नमो
सिद्धिविनायक तू योगीशाय तू
कमलाक्षाय तुज नमो
शरण्याय तू  पूर्णाय तू
वेदस्तुताय  तुज  नमो
सुमुखाय तू गणेशाय तू
अनंताय   तुज   नमो
तुज नमो ! तुज नमो ! तुज नमो !

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, नोव्हेंबर १५, २०२१

तूच दिसे मज

देवा,तू आहेस फुलात
म्हणून दरवळे परिमळ
गुंततो  फुलात  मी रे  विसरुन भान सारे

देवा तूच आहे पाऊसधारा
म्हणून खुलते वसुंधरा
नयनी भरतो ते चैतन्य,विसरुन भान सारे

देवा,तूच आहे किरणांत
म्हणून पळतो तिमिर
जागते जीवनाची आस विसरुन भान सारे

देवा तूच वाहतो वारा
म्हणून घेतो मी श्वास‌
आळवितो नाम तुझे विसरुन भान सारे

देवा आहेस बिज तू 
म्हणूनच अंकुरे तू  मातीत   
पाहतो अनंतकोटी रुपं विसरुन भान सारे
 
तू बिजात,पानांत,फुलात,जलात
गगनात,श्वासात रज:कणी,वृक्षात
गिरी-कंदरी,पशू पक्ष्यात 
पाहतो  सर्वत्र  तूज मी,विसरुन भान सारे

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
    म्हसावद
   भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

सोमवार, नोव्हेंबर ०८, २०२१

लक्ष्मणाचे बंधुप्रेम

🌹 जय श्रीराम !✍️

प्रभू श्रीरामांचे अवतार कार्य अतुलनीय असे आहे.त्यांनी समस्त मर्यादांचे पालन केल्याने ते
' मर्यादा पुरुषोत्तम ' ठरले.पण त्यांच्या कार्यात त्यांची सावली बनुन जगणारी एक महत्वाची व्यक्तीरेखा...ती म्हणजे लक्ष्मण होत!
लक्ष्मण हे प्रभू रामाचे संपूर्ण अवतार कार्यात सदोदित सावली बनून सोबत राहिले.त्यांच्या त्यागाला सीमा नाही.रामकथा लक्ष्मणाशिवाय पुर्णच होऊ शकत नाही.ते आपण आज जाणून घेऊ या---
राम-रावण युद्धानंतर श्रीराम अगस्त्य ऋषींना म्हणाले,
" की आम्ही रावण आणि कुंभकर्ण ह्या शक्तीशाली वीरांचा वध आणि लक्ष्मणाने रावणपुत्र इंद्रजीत आणि अतिकाय या दोन्ही असूरांचे निर्दालन केले."
त्यावर ऋषी अगत्स्य म्हणाले," श्रीरामा, रावण आणि कुंभकर्ण हे महाशूर होते.पण त्याच्याहून ही महाशक्तीशाली तर इंद्रजीत होता.त्याने प्रत्यक्ष इंद्राला जिंकून घेतले होते.अशा या महाविराचा वध लक्ष्मणाने केला हा पराक्रम साधा नव्हे ! म्हणून लक्ष्मण हे अतिशुर योद्धा होत ."  हे ऐंकूण श्रीरामांना आश्चर्य वाटले खरे , पण प्रिय भावाची स्तुती ऐंकूण त्या़ंना मनोमन आनंदही झाला.पण तरी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या कुतूहलाने उचल खाल्लीच !
ते विचार करु लागले की, " ऋषी अगत्स्य का म्हणाले की,इंद्रजीतला मारणे हे रावणापेक्षाही महाकठीण होते ? "
त्यांच्या शंकेला उत्तर देताना ऋषी अगत्स्य म्हणाले,
" श्रीरामा , इंद्रजीताला असे वरदान होते की त्याचा वध असा माणूस करेल की ज्याने..." ते क्षणभर थांबले.
" बोला ऋषीवर,कोणते वरदान ? आणि कोणता माणूस ? " श्रीराम असे म्हणताच ऋषी अगत्स्य म्हणाले ,
" श्रीरामा , इंद्रजीताचा वध तोच माणूस करु शकणार होता जो...
१) चौदा वर्षांत ज्याने पळभरही झोप घेतली नसेल.
२) चौदा वर्षांत ज्याने एक क्षणही स्रीमुखाचे दर्शन घेतले नसेल.
३) चौदा वर्षांत एकही घास जो जेवला नसेल. "
श्रीराम म्हणाले, " ऋषीवर हे कसे शक्य आहे.
वनवासात असताना मी नियमित लक्ष्मणाला त्यांच्या वाट्याची,हिश्याची फळे देत होतो. 
दुसरी बाब , मी  व सीता एका कुटीतच राहत होतो,
आणि जवळच दुस-या पर्णकुटीत लक्ष्मण राहत असे.
त्याने सीतेचे मुखदर्शन घेतले नसावे हे शक्यच नाही.
तिसरी गोष्ट,लक्ष्मण चौदा वर्ष झोपलाच नाही हे कसे शक्य आहे.मला हे अशक्य वाटत आहे ."
श्रीरामांनी सांगितलेली गोष्ट ऐकताच ऋषी अगत्स्यांनी स्मित हास्य करीत श्रीरामांच्या मनातील गोष्ट अंर्तज्ञानाने जाणून घेतली.रामाचे गुणगान तर सप्तखंडात होत होते.पण लक्ष्मणाचा त्याग आणि तप व बंधुप्रेमाची चर्चा अयोध्येतील घराघरात व्हावी असे  श्रीरामांनाही वाटत होतेच!
ऋषी अगत्स्य म्हणाले , " श्रीरामा,आपण ह्या गोष्टी लक्ष्मणाकडूनच जाणून घेतल्या तर...? "
लक्ष्मणजीला बोलावण्यात आले, त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला जे विचारण्यात येईल,त्याचे उत्तर खरेखुरे असेच द्यावे ! 
श्रीरामांनी विचारले,  " लक्ष्मणा ,
१) आपण तीघेही चौदा वर्ष वनवासात सोबत राहिलो असता,तू तुझ्या वहिनीचे मुख  बघितले नाही का ?
२) तुला तुझ्या वाट्याची फुले-फळे मी दररोज आहारासाठी दिली तरी ती तू का खाल्ली नाहीस ?
३) आणि तू १४ वर्ष  का झोप घेतली नाहीस ?
तुला हे कसे काय शक्य झाले ? ते सांग ! "
श्रीरामांनी विचारलेल्या तीनही प्रश्नाला विनम्रतेने उत्तर देत लक्ष्मणजी म्हणाले,
" हे प्रभो,
✍️  तुम्हाला आठवत असावे की,जेव्हा वहिनींच्या शोधात फिरत असता आपण ऋष्यमुख पर्वतावर पोहोचलो तेव्हा सुग्रीवाने काही दागिने दाखवून त्यावरुन ओळख पटविण्याचे सांगितले.तेव्हा मी फक्त वहिनीच्या पैंजणाशिवाय दुसरे कोणतेही दागिने ओळखू शकत नसल्याचे बोललो होतो.कारण मी  माझ्या वहिनीच्या चरणाव्यतिरिक्त तिला बघितलेच नाही.
✍️* चौदा वर्ष मी भोजन न करता कसा राहिलो तर..तुम्ही मला माझ्या वाट्याचे फुलं-फळ देतांना " हा ठेव तुझा वाटा ! " असे म्हणून मला नियमित देत होते.तुम्ही मला " तू हे खाऊन घे ! " असे कधी म्हटलेच नाही.तुमची आज्ञा नसल्याने मी भोजन कसा घेऊ !
तुम्ही दिलेले ते फुलं-फळ मी सर्व सांभाळून ठेवली आहे . ते सर्व आताही पर्णकुटीत पडूनच आहेत.
लक्ष्मणजी चित्रकुट पर्वतावरील पर्णकुटीत जाऊन फूलं-फळांची टोपले उचलून घेऊन आले.ती श्रीरामांसमोर ठेवली.ती फळे मोजण्यात आली.त्यात सात दिवसांची फळे कमी भरली.तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, " ज्याअर्थी सात दिवसाची फळे कमी भरताहेत.त्याअर्थी हे लक्ष्मणा,तू निदान सात दिवस तरी जेवलाच आहेस की ! "
त्याचाही हिशेब देत लक्ष्मणजी म्हणाले, 
✍️" हे प्रभो,
मला पुढील सात दिवस फूल-फळं मिळालीच नाहीत . ते सात दिवस असे-
१) ज्या दिवशी आपणास पिताश्रीच्या स्वर्गवासाचा शोकसंदेश मिळाला,त्या दिवशी आपण निराहारी म्हणजेच काहीच न खाता  राहिलो.
२) ज्या दिवशी रावणाने मातासितेचे हरण केले त्या दिवशी आपण शोकमग्न होऊन मातेच्या शोध घेत राहिलो.  फळे आणावयास कोण जाणार तो दिवस आपण निराहार काढला.
३) ज्या दिवशी तुम्ही समुद्रदेवाला प्रार्थना करुन त्यांची संमती मागीत होता.तो एक दिवस.
४) ज्या दिवशी तुम्ही इंद्रजीताच्या नागपाशात बांधले गेल्याने मुर्छित पडून राहिले.तो दिवस निराहार होता.
५) ज्या दिवशी इंद्रजीताने मायावी सितेला कापल्याने आपण सर्व शोकमग्न होतो.तो दिवस निराहारी गेला.
६) ज्या दिवशी रावणाने मला शक्तीने मारले.तो दिवस सगळेच निराहार राहिले.
७) ज्या दिवशी तुम्ही स्वतः रावण वध केला.त्या शोकात आपण निराहारी राहिले.
प्रभो,भ्राता...ह्या सात दिवशी आपणास वा इतर कोणासही जेवण्याची इच्छा तरी होती काय ? आणि हो , गुरुदेव विश्वामित्रांकडून मला एक दिव्य विद्या प्राप्त झाली होती.ती म्हणजे ' काहीही न खाता जीवंत राहण्याची विद्या ! '
त्याच विद्येच्या बळावर मी चौदा वर्ष माझ्या भूखेवर नियंत्रण ठेवू शकलो.
✍️ तिसरी गोष्ट म्हणजे मी चौदा वर्ष झोपच घेतली नाही ते कसे...ते सांगतो ,
तर,तुम्ही आणि वहिनी एका पर्णकुटीत विश्रांती घेत.मी मात्र बाहेर थांबून रात्रभर माझ्या धनुष्याला बाण चढवून डोळ्यांची पापणी लवू न देता जागता पाहरा करीत असे.चौदा वर्षाच्या काळात मी निद्रेला माझ्या बाणांनी बांधून ठेवले होते.निद्रेने शेवटी हार मानून मला वचन दिले होते की,चौदा वर्ष ती मला स्पर्शही करणार नाही.
पण भ्राताश्री,तुम्हाला स्मरत असेल तर,तुमच्या राज्याभिषेक होत असता माझा हातून छत्र खाली पडले होते.कारण तेव्हा मला निद्रेच्या स्पर्श झाला होता. ह्या कठोर तपामुळेच  आणि संयमामुळेच मी इंद्रजीतास ठार करु शकलो.
प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणजीची कठोर व संकल्पित निष्ठा ऐंकूण त्यांना हृदयासी लावले.
        🙏🙏🙏🌹धन्य ते लक्ष्मणजी! 🌹🙏🙏🙏
          🙏🙏🙏🌹धन्य ते बंधुप्रेम !🌹🙏🙏🙏

      🙏🌹🙏ॐ लं लक्ष्मण देवताभ्यो नमः:🙏🌹🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

तुज नमो!

श्री गजाननाय भिमोदराय
उमासुताय   तुज नमो
भालचंद्राय तू गणनायकाय तू
शिवपुत्राय तुज नमो
सिद्धवेदाय तू गणाध्यक्षाय तू
शुर्पकर्णाय  तुज नमो
कांतीदाय तू दिर्घतुण्डाय तू
अव्यग्राय  तुज नमो
करुणामय तू शरण्याय तू
महाग्रिवाय तुज नमो
रत्नसिंहासनाय तू नित्याय तू
मुषकाधिपवाहनाय तुज नमो
अमेयाय तू विकटाय तू
भक्तकल्याणाय तुज नमो
सिंदुरवदनाय तू शांताय तू
एकदंताय तुज नमो
सिद्धिविनायक तू योगीशाय तू
कमलाक्षाय तुज नमो
शरण्याय तू  पूर्णाय तू
वेदस्तुताय  तुज  नमो
सुमुखाय तू गणेशाय तू
अनंताय   तुज   नमो
तुज नमो! तुज नमो ! तुज नमो!

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

हे प्रभो !

हे प्रभो,
जेथे जातो तेथे तू असावा माझा सांगाती
निति ऐसी दे मज अकर्म दिसे भीती
दे गती दे  मज शुद्धमती  !
पाप न यावे मनी,हीच माझी प्रार्थना !

वृक्ष-वल्ली दिसो डोळा
खग उडू दे दशदिशी  !
आनंदात न्हाऊ दे सकल सृष्टि !
दानवता जळू दे,मानवता फूलू दे !
बंधुभाव उपजो मनी,हीच माझी प्रार्थना !

दु:ख दैन्य जळो भले
उमलू दे हर्ष मोद पुष्पदले
उच्च नीच नसे भाव
माऊलीचे पसायदान,मुखी गाऊ दे !
गीताज्ञान कळू दे सकला,हीच माझी प्रार्थना !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

जय श्रीराम

         ✒️जय श्रीराम 🌹🙏
हृदयी वसावा राम नयनी दिसावा राम

विचारात असावा राम ओठी वदावा राम

मनात ठसावा राम कामात बसावा राम

शब्दांत मिळावा राम कर्मात लाभावा राम

सत्य शिव सुंदर राम मी करीतो प्रणाम

वाचावा राम बोलावा राम स्मरावा राम

चौ-याशीचा मुक्तीदाता जन्माचा पूर्णविराम

✒️ विजयादशमी-दसरा पावन पर्वाला
आपणास महन्मंगल शुभदायक 
🙏🙏🙏🌹हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव: देवी सिद्धिदात्री

🌹शारदीय नवरात्र : नववा दिवस/नववी माळा 🌹
           💎 देवी स्वरुप- सिद्धिदात्री 💎
शारदीय नवरात्र (ऑक्टोबर २०२१) मधील आजच्या नवव्या नवदुर्गेचे स्वरुप सिद्धदात्री...नवव्या माळेला देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते. अश्विन/शारदीय नवरात्रीची सांगता विजयादशमीने होते. आज नवदुर्गा देवी स्वरुप हे सिद्धिदात्री देवीच्या स्वरुपात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या पृथ्वीतलावर संचार असल्याचे म्हटले जाते.

💎 कमळावर आरूढ सिद्धदात्री देवीचे स्वरुप
दुर्गा देवीचे नववे स्वरुप म्हणजे सिद्धिदात्री देवी. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला
 " सिद्धिदात्री " असे संबोधले जाते. सिद्धिदात्री देवी
 भगवान विष्णूची प्रियतमा देवीलक्ष्मी प्रमाणेच कमलपुष्पाच्या आसनावर विराजमान आहे. देवी मधुर व गोड स्वरांनी आपल्या भक्तांना वरदान प्रदान करते. सिद्धिदात्री देवी सिंहावर स्वार असून चतूर्भूज आहे. एका हातांमध्ये कमळ,दुस-या हाती शंख, तिसऱ्या हातात गदा, आणि चौथ्या हातात सुदर्शन चक्र धारण केले आहे. सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. देवीने श्वेत वस्त्र परिधान केल्याने तिचे स्वरुप अधिकच मनमोहक भासते.म्हणून देवीला " प्रसन्न वदना " असेही म्हणतात. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होते, अशी भक्तांची श्रद्धा व मान्यता आहे.

💎 अर्धनारीश्वर

१) अणिमा, २) महिमा, ३) गरीमा, ४) लघिमा, ५) प्राप्ती, ६) प्राकाम्य, ७) ईशित्व आणि ८) वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. देवी पुराणात वर्णन मिळते की, भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे भक्त श्री शंकराला ''अर्धनारीनटेश्वर '' या नावानेही ओळखतात.

💎 मंत्र

वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।
कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्॥

💎 देवी सिद्धिदात्रीचा ध्यान मंत्र

सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।।


💎 सिद्धिदात्री देवीचे पूजन 

     असे म्हणतात की, नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा ऋषि-मुनि, साधक, यक्ष, किन्नर, देवता, दानव आणि गृहस्थाश्रमी जीवन व्यतीत करणारे सांसारिक स्री-पुरुष पूजन करतात.देवीची पूजा व व्रत ठेवल्याने व्यक्तीला यश, धन आणि बलाची प्राप्ती होते.
      सिद्धिदात्री देवीचे पूजन करतांना नऊ प्रकारची फुले अर्पण करावे. नऊ जातीची फळ,आणि नऊरसांनी युक्त प्रसादाचा देवीला नैवेद्य दाखवून तो प्रसाद द्यावा.असे केल्याने भक्ताला धर्म, अर्थ,काम,मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती होती.


💎 व्रताची सांगता आणि महत्त्व

देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते, असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे सांगितले जाते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे काही ठिकाणी या दिवशीही कुमारिका पूजन करण्यात येते.कुमारिका पुजनानेहीही अनन्य साधारण फळप्राप्ती होते. ९ हा अंक देवीच्या नऊ रुपांचे व नऊ शक्तीचे द्योतक असल्याने या दिवशी ९ कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करावे .तसेच भैरव रुपात एका बालकाचीही
पूजा करावी. आणि नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी, असे सांगितले आहे.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
 

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव: आठवां दिवस : महागौरी

शारदीय नवरात्रोत्सव :आठवा दिवस/आठवी माळ🌹
           💎 नवदुर्गा स्वरुप : महागौरी 💎
 
शारदीय ( ऑक्टोबर २०२१ ) नवरात्रीच्या आठवा दिवस हा देवी महागौरी पुजनाचा असतो. 
२०२१ च्या शारदीय नवरात्रोत्सव यंदा नऊ दिवसांसाठी नाहीतर, आठच दिवसांसाठी साजरा केला जाणार आहे. शारदीय नवरात्र, यंदाच्या वर्षी गुरुवारी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु होऊन, १४ ऑक्टोबर गुरुवारीच संपन्न होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्यानं यंदा नवरात्री आठ दिवसच साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे. ७ ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदापासून सुरु होऊन दुर्गा महानवमी १४ ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. तसेच १५ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे.

 💎 काय आहे गुरुचा विशेष योग?

भारतीय धर्मशास्त्रानुसार, गुरु हे ज्ञान आणि बुद्धिचे दैवत मानले जातात.. त्यांना सर्व देवांचं गुरु मानलं जातं. यंदाच्या वर्षी गुरुवारी नवरात्री सुरु झाली आणि गुरुवारीच नवरात्रोत्थान होणं शुभं मानलं जात आहे. असा योग अनेक वर्षांतून एकदाच जुळून येतो. 
म्हाळसा फलज्योतिष केंद्राचे (ज्योतिष प्रविण) श्री. वसंत कुलकर्णी ( म्हसावद,ता.शहादा) म्हणाले की, "अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ६ ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी ४.३४ वाजता प्रारंभ झाली आणि जी गुरुवारी ७ ऑक्टोबर दुपारी १.४६ वाजेपर्यंत राहिली.त्यामुळे ७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी घटस्थापना झाली असून याच दिवसापासून देवीची आराधनाही केली जाते आहे.

💎 देवीचा आवडता रंग
  
आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. देवीला गुलाबी रंग अत्यंत प्रिय असून हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक समजला जातो. 

💎 का आठच दिवस साजरी केली जाणार नवरात्र? 

यंदाच्या वर्षी तृतीया तिथी आणि चतुर्थी शनिवारी एकाच दिवशी आली आहे. ज्यामुळे चतुर्थीचा लोप झाला. म्हणून यंदा चंद्रघंटा आणि कुष्मांडा या देवीच्या रुपांची एकाच दिवशी पूजा करण्यात आली आहे. याच कारणामुळं नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा करण्यात येत आहे. 

💎 देवी स्वरुप: महागौरी 
शारदीय नवरात्रोत्सवात महालक्ष्मी व्रताला आत्यंतिक महत्व आहे.जे भाविक भक्त नवरात्रीला पहिल्या दिवसापासून व्रत ठेवतात.ते नवरात्रीत दुर्गाअष्टमीचे व्रत हमखास ठेवतात.
पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीशिवशंकर आपल्याला पती म्हणून लाभावे.यासाठी पार्वतीने कठोर व घोर तपश्चर्या केली होती.तपाचरणामुळे देवी पार्वतीच्या देहाचा गौर रंग काळा झाला होता.पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले त्यांनी देवीला पुन्हा गौरवर्ण प्राप्तीचे वरदान दिले.म्हणून देवी पार्वती ही " महागौरी " म्हणून ओळखली जाऊ लागली.महागौरीचे श्रद्धापूर्वक पूजन करुन आणि महालक्ष्मीचे व्रत राखल्यास भक्तांना सुख,समृद्धी,प्राप्त होऊन त्यांचे पाप नष्ट होते.अशी भक्तांची श्रद्धा आहे.

💎 होम हवन :-

दुर्गा अष्टमीच्या पावन पर्वाला अनेक ठिकाणी होम हवन विधी केला जातो.

💎 देवीचा बीज मंत्र: 

" श्री क्लीं ह्रीं वरदायै नम:। "

अन्य मंत्र:

१] " माहेश्वरी वृष आरूढ़ कौमारी शिखिवाहना।

      श्वेत रूप धरा देवी ईश्वरी वृष वाहना।। "

२] ओम देवी महागौर्यै नमः।

💎 कन्या पूजन व महत्त्व

देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीची उपासना केली जाते. सरस्वती, दुर्गा,भवानी,अंबा, काली, चंडिका,लक्ष्मी ही स्त्रीशक्तीची प्रमुख रूपे. महन्मंगल मातृरूप पार्वती, कलासक्त गौरी अशा अनेक रूपात तिची आराधना केली जाते. संपूर्ण भारतवर्षात देवीची ५१ शक्तिपीठे असून त्यापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत.
ती शक्तीपीठे :-
(१) कोल्हापूरची महालक्ष्मी (२) तुळजापूरची भवानी (३) माहुरगडाची रेणुका ही तीन पूर्ण पीठे व (४) वणीची सप्तश्रृंगीनिवासिनी हे अर्धपीठ. महिषासुराचा वध केल्यानंतर काही काळच आदिशक्ती येथे विसावली होती. म्हणून हे अर्धेपीठ मानले जाते.
नवरात्रीचा संबंध जगत्जननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. देवी दुर्गाची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. असे म्हणतात की,ह्या विश्वात स्त्रीत्वात देवीचा अंश असतो.आणि म्हणूनच. नवरात्रीत दोन ते दहा वर्ष वयाच्या नऊ मुलींची/ कुमारिकांची पूजा करण्याची अनादिकाळापासून परंपरा आहे. या बालिकांना साक्षात ९ देवीचे रूप मानले जाते. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिकांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा चालत आली आहे..
     कुमारिकांना पाय धुऊन आसनावर बसवावे. हातावर लाल रंगाचा धागा बांधून कपाळी कुंकू लावावे. प्रसाद आणि दक्षिणा द्यावी. घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावा. 
कुमारिका वयाच्या कितव्या वर्षी देवीच्या कोणत्या रूपात असते. आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते पुढीलप्रमाणे :-

 १) दोन वर्षाची बालिका कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य नष्ट होते.
२) तीन वर्षाची बालिका त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
३) चार वर्षाची बालिका कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
४) पाच वर्षाची बालिका रोहिणी रूपात असते. ती संपूर्ण घर रोगमुक्त ठेवते.
५) सहा वर्षाची बालिका कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
६) सात वर्षाची बालिका चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
७) आठ वर्षाची बालिका शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
९) नऊ वर्षाची बालिका दुर्गा देवीचे रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
१०) दहा वर्षाची बालिका सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव : देवी कालरात्री

🌹 नवरात्रोत्सव : सातवी माळा : 🌹


💎 देवी स्वरुप : देवी कालरात्री 💎


नवरात्रोत्सवातील  सप्‍तमी त‍िथी ही देवी कालरात्रीला समर्पित आहे. सातवी माळ झेंडूच्या फुलांची बांधावी, व भक्ताने  देवीची श्रद्धाभावे उपासना करावी.

💎 कालरात्री देवीचे स्वरुप 

देवीचे स्वरुप रात्रीच्या अंधारासारखे काळे आहे.देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात.देवीचे केस विस्कटलेले असून गळ्यात विद्युल्लता सारखी चमकणारी नर मुंडमाला घातली आहे.देवी कालरात्री चतुर्भूज असून देवीच्या एका होती कटोरा,एका हातात लोहंकुश आहे.आणि उर्वरित दोन हात मुद्रा स्थितीत असून पैकी एक हात वर मुद्रा आणि दुसरा  अभय मुद्रेत आहे.देवी त्रीनेत्रा असून गर्दभावर स्वार आहे.तिची भावमुद्रा भयानक कोपीष्ट अशी आहे.

 💎 देवीची प्रकट कथा     

असे म्हटले जाते की, भगवती कालरात्री देवीची उत्पत्ती असूर चण्ड-मुण्ड यांच्या निर्दालनासाठीच झाली.कथानुसार दैत्य राज शुंभच्या आज्ञेने चण्ड-मुण्ड आपली चतुरंग सेना घेऊन प्रत्यक्ष देवीला बंदी करण्याच्या हेतूने गिरीराज हिमालय पर्वतावर गेले.तेथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष देवीला बंदिवान करण्याचे धाडस केले.त्यांच्या त्या दृष्ट कृत्याने देवी भगवती अत्यंत क्रोधीत झाली.देवीला प्रचंड संताप झाला..क्रोधाने भगवतीचे वदन प्रचंड काळे झाले आणि बाहू मध्ये प्रचंड स्फूरण निर्माण झाले.त्याक्षणी अत्यंत क्रुद्ध देवी भगवतीने कालीस्वरुप धारण केले.

💎 देवीचे आवडते रंग 

आज बुधवार तिथी महाष्टमीच्या पावक पर्वाला नवरात्रोत्सवाला कालरात्रीची पूजा करण्यात येते. देवीला गडद नीळा रंग अतिप्रिय असून या रंगदर्शनाने देवीचे रुप अतुलनीय आनन्दाची अनुभूती देते. निळा रंग हा समृद्धी आणि शांतीचे प्रतिक म्हणून वापरला जातो.नवदुर्गा देवीने कालरात्री रुपात चण्ड-मुण्ड दैत्यांचा विनाश करुन त्रिखंडात सुख ,समृद्धी आणि शांतता निर्माण केली होती.देवीच्या या रुपातील दर्शनाने भक्तांच्या जीवनात चैतन्य येऊन समृद्धी आणि शांतता निर्माण होते.अशी दृढ समज आहे.

💎 कालरात्री देवीची आयुधे 

देवी कालरात्रीने आपल्या एका हातात तलवार आणि एका हातात पाशांकुश,शरीरावर लाल रंगाचे चर्मांबर परिधान केले असून,आणि गळ्यात नरमुण्डमाला विराजित आहेत. प्रकटप्रसंगी  देवी कालरात्रीच्या अंगावरील मांस पुर्णपणे नष्ट होऊन देवीचे शरीर हे फक्त हाडांचा सापळाच उरला होता.असे वर्णन आढळते.भगवतीचे  हे रुप प्रचंड भितीकारक व क्रुद्ध भासत होते.देवीचे तोंड प्रचंड विशाल ,आणि सळसळत्या जीभेमुळे देवीचे स्वरूप पाहताच भिती वाटावी इतके भयप्रद बनले होते.डोळ्यातून क्रोधाचा अंगार बाहेर पडत होता.देवीच्या भयंकर गर्जंनांनी दशदिशा जणू प्रचंड नाद उमटत होता.देवीने कालरात्री रुपात महाभयानक अशा दैत्यांचा वधाचे सत्र आरंभिले.आणि चण्ड-मुण्डच्या चतुरंग सेनेवर देवी कालरात्री वायुवेगे तुटून पडली व सैन्याचे भक्षण करीत देत्य सेनेला त्राहीमाम करीत सुटली.

💎 देवी कालरात्रीच्या जप  मंत्र

 " दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभूषणे।

   चामुण्डेुण्डमथने नारायणी नमोऽस्तु ते।

   या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता।

   नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। " 

देवी कालरात्री भक्तवत्सला असून सदैव आपल्या भक्तांवर कृपा करणारी म्हणून ओळखली जाते. ती भक्तांनी केलेल्या भक्तीने प्रसन्न होऊन शुभदायक फल देते.म्हणून देवी कालरात्रीला " शुभंकरी " असेही म्हणतात.भक्तांच्या सर्व दुःख,दैन्य,व्याधी,ताप दूर करणारी ही कालरात्री समस्त संकटे दूर करण्याचे वरदान देणारी म्हणून तिची ख्याती आहे.

💎 देवी कालरात्री पूजनाचे फलित 

देवीची कृपा मिळविण्यासाठी तिला अनन्य भावे शरण जाऊन भक्ती,पूजन केले असता,ती भक्तांना पावते.देवीचे पवित्र गंगाजलाने,पंचामृताने आणि फुलं,गंध, अक्षतांनी पूजा करावी.देवीला गुळाचा प्रसाद अती प्रिय असून हा प्रसाद द्यावा.देवी कालरात्री चे पूजन करतांना ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून काया वाचा मनाने भक्त पावक असावा.

[ टिप - सदर लेखातील माहिती ही सामान्य माहिती असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ पंडीताची मदत घ्यावी.ब्लाॅग लेखक कोणतीही हमी देत नाही.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

नवरात्रोत्सव : देवी स्वरुप :कात्यायनी

🌹 शारदीय नवरात्र: सहावी माळ : 🌹
💎 देवी स्वरुप : कात्यायनी 💎
    
    ऋषी कात्यायण यांनी देवीला आपल्या तपोबलाने प्रार्थना केली की, " हे देवी ! तू माझ्या कन्येच्या रुपात माझ्या घरी जन्म घे! " देवीने ऋषी कात्यायन यांच्या इच्छेनुसार कन्या रुपात जन्म घेतला.
 सर्वप्रथम कात्यायन ऋषींनी देवीची पुजा केल्याने तिचे नाव
 " कात्यायनी " असे झाले.देवी भागवत, मार्कण्डेय पुराण आणि स्कंद पुराणात देवी कात्यायनीची कथा वाचावयास मिळते.
तत्प्रसंगी महिषासूर हा उन्मत्त झालेला होता.त्याने तिन्ही लोकी उत्पात माजविला होता.देवीने उग्र रुप धारण करुन महिषासूराचा वध केला.तिन्ही लोकी आनंद निर्माण झाला. 
 दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख म्हणून
" महिषासुरमर्दिनी " असा केल्याचे सांगितले जाते. 

💎 कात्यायनी देवीचे स्वरुप 

कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.देवीचा अवतार धारण करण्याचा मुख्य उद्देश असूरांचा वध, धर्माची पुनर्स्थापना, धर्मसंरक्षण असल्याचे म्हटले जाते. 
देवीला लाल रंग अधिक प्रिय असल्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान करुन देवीची पूजा,भक्ती करणे फलदायक ठरते.

💎 कात्यायणी देवीचे पूजन

दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश केल्यास अधिक लाभ मिळतो तसेच देवीला गोडधोड नैवेद्यही अधिकच प्रिय असल्याचे म्हटले जाते.म्हणून कात्यायनी देवीला दुध-साखरेचा गोड प्रसाद अर्पण करता येईल. त्रास नाहीसा होईल आणि लाभ होईल.


💎 कात्यायनी देवी पूजनाचे फलित :-

मान्यता आहे कि देवी कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी ३ ते ४ फूलं घेऊन
 " कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
   स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥ "
हा मंत्र १०८ वेळा जप केल्यास व नंतर ही फुलं देवीचरणी अर्पण केल्यास फलदायी ठरते.कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो.श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही देवीचे पूजन केले असल्याचे सांगितले जाते. देवीच्या कृपेने विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते.

[टिप: या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य ऐकीव,श्रवणीय माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, ऑक्टोबर १०, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव : पाचवी माळ: स्कंदमाता

शारदीय नवरात्रोत्सव: पाचवी माळ 
💎दुर्गादेवीचे स्वरूप : स्कंदमाता 💎

आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. आतापर्यंत आपण देवीच्या चार रुपांची माहिती जाणून घेतली.
नवरात्रीचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.   
 
नवरात्रीचा पाचवा दिवस : देवी स्कंदमाता

" सिंहासनगता नित्य पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।। "

दुर्गेचे पाचवे रूप '' स्कंदमाता " या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन " विशुद्ध '' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.
भगवान स्कंद '' कुमार कार्तिकेय '' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे देवीच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओंळखले जाते. 
💎 दुर्गादेवीचे स्कंदमाता स्वरुप 

स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे नवदुर्गेचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.

💎 स्कंद शब्दाचा अर्थ: 
 
स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.

💎 स्कंदमाता उपासनेचे फळ 

स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.
      हा पाचवा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. 

💎 पाचवी माळ

पाचवी माळ ही बेल किंवा कुंकवाची वाहतात..

💎 स्कंदमाता देवीचा मंत्र

" सिंहासना गता नित्यं पद्माश्रि तकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।
या देवी सर्वभू‍तेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। "

💎 स्कंदमाता पूजन 

देवीचे पूजन करताना सौभाग्यलंकार अर्पण करावे. लाल रंगाचे फूल, अक्षता वाहावे. 

💎 स्कंदमातेला नैवेद्य :

 देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा. देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जुन वापर करावा.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प  "

शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१

शारदीय नवरात्रों : चौथी माळ : दुर्गास्वरुप- कुष्मांडा

        🌺  शारदीय नवरात्रोत्सव : चौथी माळ 🌺
                  🌹 देवीस्वरुप- कुष्मांडा 🌹
   
 कुष्मांडा शब्दाचा अर्थ:- 
 
  " कु " ह्या अक्षराचा अर्थ आहे - पृथ्वी. ऊष् शब्दाचा अर्थ - आधार,उष्णता. आणि मा अक्षर हे आई किंवा लक्ष्मी अर्थाने. आणि अंड शब्दाचा अर्थ - मोठा...या अर्थाने विश्वातील सर्वात मोठे आहे ते ब्रम्हांड किंवा सृष्टि.
अर्थातच जिच्या उष्णतेने हे ब्रम्हांड किंवा सृष्टी उत्पन्न झाली,ती देवी कुष्मांडा ! म्हणजेच नवरात्रीतील चौथे दुर्गारुप आई " कुष्मांडा " होय.

 " सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।। "

     दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव '' कुष्मांडा '' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. 
     नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन '' अदाहत '' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती, आदिमाया, आदिजननी आहे.

     कुष्मांडा देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहाही दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. 

💎 कुष्मांडा देवीचे स्वरूप :-

    कुष्मांडा देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात अनुक्रमे कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.

💎 कुष्मांडा देवीची पुजा-अर्चा :- 

    कुष्मांडा देवीची पुजा करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कूष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा

💎 कूष्मांडा देवीचा मंत्र

   कुष्मांडा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा. शक्य असल्यास यथाशक्ती जप करावा.


🙏१) ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

🙏२)या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
         नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

💎 कुष्मांडा देवीची कृपा प्राप्ती :-

    कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे अनन्यभावे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा मातेची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. भक्ताला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.

{टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.}


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शारदीय नवरात्रोत्सव: तिसरी माळ- देवी चंद्रघंटा

शारदीय नवरात्रोत्सव: तिसरी माळ - चंद्रघंटा
     
     नवरात्री मग ती वासंतिक नवरात्र असो वा शारदिय नवरात्र. दुर्गा मातेच्या प्रत्येक रुपाचे, प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रुपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात.

आईला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करावे. ❤️आज चैत्र नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते . भाविक या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात.देवीला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करतात. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरुपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे देवी उपासना करणा-या भक्तांच्या चेहर्‍यावरील तेज वाढतं. म्हणून या देवीला चंद्रघंटा म्हणतात.चंद्रघंटा देवीला कमल आणि शंखपुष्पीचे फूल अर्पण करावे. आज तिसऱ्या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.   
तसंच देवीला दूध किंवा दूधापासून तयार केलेली मिठाई किंवा खीरीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला प्रत्येक कामात यश मिळवून देते.नवरात्रीचा
 तिसरा दिवस दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाला समर्पित असतो. या दिवशी पूजा करताना भक्तांनी तपकिरी रंगाचे कपडे घातले तर आई चंद्रघंटा प्रसन्न होते.
❤️ देवीचे स्वरूप-
चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे.चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. या रुपात देवीला दहा हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा पाचवा हात अभय मुद्रामध्ये राहतो. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे.

❤️ चंद्रघंटा देवीचे पूजन

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम. तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले आहे. याशिवाय देवीला मध अर्पण करावा, 

❤️ चंद्रघंटा देवीचा मंत्र

चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा.

" पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।"

❤️ चंद्रघंटा देवीची महती

असे सांगितले जाते की, भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली.या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे मानले जाते.आज तिसऱ्या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.   

❤️ देवी चंद्रघंटाची पूजा कशी करावी :-

देवी चंद्रघंटाची मूर्ती असल्यास खूपच उत्तम.पण देवीची मूर्ती नसल्यास फोटोला एका पाटावर ठेवा. त्यानंतर विधीवत देवीची पूजा करा. देवीला कुंकू, अक्षता, धूप, पुष्प आणि दूधापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या आराधनेसाठी 
“ ऊं देवी चंद्रघंटायै नम: ” या मंत्राचा जप करा. तसेच, दुर्गा चालीसा म्हणावा. दुर्गा आरती केली तरी देवी भक्ताला पावते.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव-

शारदिय नवरात्रोत्सव -२०२१
नवरात्रोत्सव हा विशेष करुन गुजरात राज्यात आणि पश्चिम बंगाल राज्यात मोठया धुमधडाक्यात व आनंदाने साजरा केला जातो. आज इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा सर्वत्र बोलबाला आहे.त्याचा परिणाम कोणताही उत्सव असू द्या...तो सर्वच ठिकाणी अनुभवणे,साजरा करणे सोपे ठरु लागले आहे‌
शरद ऋतुतील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होणारा शारदीय नवरात्रोत्सव हा एक परंपरेचा भाग आहे. अलीकडे महाराष्ट्रातही दुर्गा उत्सव शहरी भागांसह अगदी खेड्या-पाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला आहे.शारदीय नवरात्रींनाच दुर्गादेवीचे नवरात्र म्हणतात. जातात. प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काळ हा या कृषिप्रधान उत्सवासाठी निश्चित केलेला आहे. 
     महिषासुर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गा देवीचे आवाहन केले. देवीच्या या शक्ती रुपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध झाले. प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला. यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे करण्याची परंपरा सुरू झाली, अशी देखील पुराण कथा असल्याचे सांगितले जाते.
     दुर्गा देवीचा उत्सव वर्षातून दोनवेळा साजरा करण्याची ही प्रथा अगदी वेदकाळापासून चालत आली आहे. 
चैत्र शु ।। प्रतिपदापासून ते चैत्र शु।। नवमीपावेतो (श्रीरामनवमी) साजरा केला जातो. हा वासंतिक 
 चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे.रब्बीचा हंगाम सुरू झाला की चैत्रातील उत्सव साजरा होतो.
      दुसरा नवरात्रोत्सव आश्विन शु।। प्रतिपदापासून घटस्थापना करुन विजयादशमीपर्यंत साजरा केला जातो. शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जाते. खरीपाचा सुगीचा हंगाम सुरू झाला की,शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ होतो. 
दोन्ही नवरात्रोत्सव शेतकर्‍यांच्या कामाशी निगडित आहे. 
शेतीची कामे संपली की शेतकर्‍यांना उत्साहाने या उत्सवात सहभागी होता यावे, अशी या मागील संकल्पना असावी. याच नऊ दिवसांत दररोज एक माळ अशा नऊ माळा देवीला चढवली जाते.
मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)
अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचे अत्यंत विलक्षण आणि अद्भूत असे नऊ दिवसांचे महापर्व मानवाच्या अंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकारांचे प्रतिनिधित्व करते. याच ऊर्जेला नऊ देवींच्या शक्तीची उपमा दिली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगळेवेगळी रुप असल्याचे म्हटले जाते. 
    आज अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीत आपण देवीच्या नऊ रूपांचे महात्म्य जाणून घेणार आहोत.ही नऊ रूपे :-

" प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चंद्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीच् ।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं ।
नवममं सिद्धिदात्रीच नवदुर्गा: प्रकीर्तिता:।।"
देवीच्या नऊ रूपांची नावे वरील श्लोकात दिली आहेत. 

१) शैलपुत्री, २) ब्रह्मचारिणी, ३) चंद्रघंटा, ४) कूष्मांडा, ५) स्कंदमाता, ६) कात्यायणी, ७) कालरात्री, ८) महागौरी आणि ९) सिद्धीदात्री अशी ती नावे आहेत. देवीने जो पराक्रम गाजवला, त्याला अनुसरून देवीला या नावांनी ओळखले जाऊ लागले. काय आहे त्यामागील कथा, जाणून घेऊया.

प्रथम रुपदर्शन :-

🌹 शैलपुत्री :

आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी देवी दुर्गाचं पहिलं स्वरुप शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. नवरात्रीदरम्यान नऊ दिवस देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक घरात घटस्थापना करतात.

देवी शैलपुत्री उपासना मंत्र :-

ऊँ देवी शैलपुत्र्यै नमः।
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ।।

देवी शैलपुत्री हिला देवी पार्वतीचंच  एक स्वरुप मानलं जातं. माहितीनुसार, देवी शैलपुत्रीचे स्वरुप म्हणजे चार हात ,भाळी  अर्धचंद्र आणि त्या नंदीवर (बैल) स्वार आहे.तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ शोभून दिसते. तीला पार्वती, हेमवती, सती, भवानी इत्यादी नावानेही ओळखली जाते. शैलपुत्री शब्दाचा अर्थ डोंगराची (हिमालयाची) कन्या आहे.
    आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात `शैलपुत्री ' या नावे ओळखली जाते. हिमालयकन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने, तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ही पहिली दुर्गा होय. 
    शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता. तेव्हा तिचे नाव ` सती ' होते. त्यावेळेस सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला. एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला. सर्व देवी-देवतांना यज्ञात आमंत्रित केले. मात्र, भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही. आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे, ही वार्ता जेव्हा सतीला कळली, तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय आपले पती भगवान शंकराजवळ व्यक्त केला. भगवान शंकर म्हणाले, " सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिलेले नाही. याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे. अन्यथा, त्यांनी असे केले नसते. कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. " परंतु, सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले होते. आपण एकाच घरचे आहोत, म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाईगडबडीत राहून गेले असेल, अशीी स्वतःची समजूत  काढत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला येण्याचा आग्रह केला. तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही. त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली, परंतु आपण येणार नाही, असे कळवले. सती आनंदाने यज्ञ समारंभी सहभागी झाली. 
संपूर्ण राज्यात दिव्याच्या लखलखाट केला होता. प्रजाजन प्रसन्न दिसत होते.स्वर्गातील देव आणि सप्तर्षी,ऋषीमुनी,देशोदेशीचे
राजे पाहुणे आले होते. सगळे वातावरण आनंदी झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणीत झाला. कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला, मातेला, बहिणींना भेटते, असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोहोचली. परंतु, तिला पाहुनही कुटुंब सदस्यांपैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही. उलटपक्षी तिला दुर्लक्षित केले. त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते. सतीला गहिवरून आले. भगवान शंकरांचे बोल आठवले. आमंत्रणाशिवाय आपण उगीचच येथे आलो, असे तिला जाणवू लागले. तिच्या मनात एकाच वेळी दु:ख, कारूण्य, क्रोध, संताप उफाळून येत होता. हा अपराधी भाव घेऊन शंकरांसमोर कसे जाणार, या विचाराने तिने तिथल्या तिथे स्वत:ला यज्ञकुंडात उडी घेऊन संपवून टाकले. सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच, भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला. 
     सतीने योगाग्निद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती `शैलपुत्री ' या नावाने विख्यात झाली. पार्वती, हेमवती ही देखील तिचीच नावे. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली. तिने अनेक देव-देवतांचे गर्व हरण केले. 
 🌹देवी शैलपुत्रीची पूजा विधी

सकाळी स्नान करावं आणि या दिवशी देवी शैलपुत्रीच्या मूर्तीची पूजा करावी. देवी शैलपुत्रीच्या मंत्रांचाही जप करावा.आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीची आरती करावी.

या दिवशी या मंत्राचा जप करावा –

या देवी सर्वभूतेषु मां शैलपुत्री रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

ओम देवी शैलपुत्रीय नम: ।

सर्वस्वरूपे सर्वेशे, सर्व शक्ति समन्विते ।
भये भ्यास्त्राहि नो देवि, दुर्गे देवी नमोस्तुते।।

एतत् वदं सौमं लोचनं त्राहुशीतम् ।
पातु नः सर्वभूताभिः कात्यायनी नमोस्तुते ।।
ज्वाला करला मत्युग्रामम् शेषासुर सुदणम् ।
त्रिशुलम पातु न भितर भद्रकाली नमोस्तुते ।।

(टिप- सदर माहिती ही ऐकीव,आणि मिळालेल्या कथा-किर्तंन श्रवणातून प्राप्त आहे.वाचकांना केवळ प्राथमिक माहिती व्हावी,करिता लिहिली आहे.योग्य त्या ज्योतिषी कडून,पंडिताकडून विधी करावा.लेखक पुण्यफळाची कोणतीही हमी देत नाही.)

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शक्तीपीठ


" काव्य " सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . 
दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे
 गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . 
देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे !
 - वा . न. सरदेसाई

संकलन- प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...