Kaayguru.Marathi

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

शेल चारोळी लेखन नियम

शेल चारोळी/काव्य रचना 
एका ओळीत मुळाक्षरांची [ अक्षरसंख्या] संख्या जी आहे तीच इतर ओळींमधे असायला हवी. .
✒️ लेखन नियम :-
अ ) लेखन चार ओळीतच असावे.ही शेल चारोळी म्हटली जाते.
ब ) चार-चार ओळींचे दोन,तीन,गट केल्यास ते शेलकाव्य म्हटले जाते.
१ ) ओळीत अक्षरसंख्या किती असावी.याला बंधन नाही.पण...मला वाटते दहा सोळा-सतरा अक्षरे योग्य ठरतात.
२ ) पहिल्या ओळीत आलेली अक्षरसंख्या ही उर्वरित तीनही ओळीत सारखीच असावी.म्हणजेच चारही ओळीत समान अक्षरसंख्या यावी.
३ ) शब्दसंख्येचे बंधन नाही.पण एक ते चार ओळीत अक्षरसंख्या समसमान असावी. 
४ ) पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीची सुरूवात असावा .
५) दुस-या ओळीच्या शेवटच्या शब्दाने तिसऱ्या ओळींची सुरुवात नसावी.
६ ) तिसरी ओळ स्वतंत्र सुरुवात असावी. 
७ ) तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दानेच चौथ्या ओळीची सुरुवात करावी.
८) यमक हे दुसऱ्या ओळीच्या शेवटी व चौथ्या ओळीच्या शेवटी जुळविला असावा.
९ ) चारही ओळी ह्या परस्परांना अर्थदृष्ट्या पुरक असाव्यात.
उदा. शेल चारोळी 

✒️ आपण दोघे 

सखी,ती वेळ पुन्हा परत यावी   [अक्षरे - १२]
यावी घेऊन पुन्हा त्या आठवणी [अक्षरे - १२]
आठवणींच्या झोक्यावर असावे [अक्षरे - १२]
असावे आपण दोघे नको भीती  [अक्षरे - १२]


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

उदा. शेलकाव्य
नात्याची विण
उसवू नको ग तू नात्याची विण   [अक्षरे - १२ ]
विण पुन्हा तशी जुळणार नाही   [अक्षरे - १२ ]
तू उगाच नको वाढवूस वाद.      [अक्षरे - १२ ]
वाद हा विनाशाचे कारण होई.   [अक्षरे - १२ ]

नाते मिळत नाही कुठे बाजारी    [अक्षरे - १२ ]
बाजारी नात्याला नसतेच नाव    [अक्षरे - १२ ]
विण असू द्यावी फिट्ट आणि घट्ट [अक्षरे - १२ ]
घट्ट विणीत नक्की गावतो गाव   [अक्षरे - १२ ]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



५ टिप्पण्या:

  1. खुपच छान माहिती दिली आहे... ✍️✍️
    मी नक्की प्रयत्न करेन ...🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. वा! अप्रतिम मार्गदर्शन सर, मराठी लेखनात भर पडली 👌👌👍👍
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...