Kaayguru.Marathi

रविवार, जानेवारी ३०, २०२२

षढाक्षरी काव्यलेखन

षढाक्षरी काव्यलेखन 
------------------------------------------------------
षढाक्षरी काव्यलेखन हा कविता लेखनातील एक सहज सुलभ काव्यनिर्मितीचा प्रकार होय.
षढाक्षर शब्दांची फोड अशी करता येईल.
षढ् म्हणजे सहा .याचाच अर्थ सहा अक्षरात लिहायचे ते षढाक्षरी काव्य.
काव्य लेखन नियम :-
१) हे काव्य लिहितांना सामान्यतः चार ओळींचे एक कडवे असे लिहावे.
२) चार ओळींची कडवी किती असावी ? याला बंधन नाही.
३) पण...शक्यतो षढाक्षरी काव्यलेखन करतांना चार चार ओळींचे सहा कडवे रचिले तर ते अधिक सुंदर वाटावे.
[ माझे मत.]
४) हे काव्य लिहितांना काव्यातील प्रत्येक ओळीत मोजून सहाच अक्षरे असावीत.
५) ओळीच्या प्रारंभीच्या शब्द एक दोन तीन चार अक्षरी असला तरी चालतो.
६) अष्टाक्षरी काव्यलेखनाप्रमाणे शब्दलेखनाचे बंधन नाही.
७) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी.
८) चार ओळीपैंकी दुस-या आणि चौथ्या ओळीत " यमक " साधला जावा.हे लक्षात घ्यावे.
९) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी. 
उदा. १).                       २) 
काय मागू देवा.        * सखे तुझे रुप
तुजपाशी मी रे.        * वेड लावी मला
न मागता दिले          * काढू कसा ग मी
तू सर्वकाही रे.          * जीव हा गुंतला
चला तर मग...लिहू आपण षढाक्षरी काव्य !👍
          🙏🌹शुभस्य शिघ्रम !🌹🙏
         ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मनसागर [ चारोळी ]


राणी...!
आकाश भरलंय ग् ता-यांनी
पहाटेचा सुटला शितल वारा
पण...तुझ्या  मुख  चंद्राविना
उधाणच  नाही ग्  मनसागरा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, जानेवारी २८, २०२२

मनमीत [ भूलोळी लेखन ]


कुछ तो लोग कहेंगे
ही तर आहे जगाची रीत
उनकी बाते भूल जाना सजनी
नको करु विचार तू माझी मनमीत

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, जानेवारी २७, २०२२

माणूस

 
जीवन तुरुंगाच्या ऊंच भिंती
 येथे कुणी नाही कुणासाठी
 संपतात येथे रक्ताची नाती
 मातीही राखते ईमान
 ...जे पेरले ते अंकुरण्यासाठी
 मात्र...माणूस नेहमीच
 का असतो बेईमान ?
 स्वार्थाची माणसाला तहान
 मतलबासाठी स्वत्व ही गहाण
 आणि..जंगलही जळते 
 वणवा होऊन ..
 समर्पणाने ते ही होते बेभान
 मात्र...माणूस कृतघ्नपणे
 का होतो हैवान ?
 विश्वासाचे होतात घात
 रक्ताने माखतात हात
 श्वासाने फुंकायचा असतो श्वास
 मात्र... येथे का गळ्यात 
 वंचनेचे फास ?
 हे भग्न चित्र रंगविण्यासाठी
 अपुरा पडतो कँनव्हास
 अन्..इथेच संपते...
 जीवनायुष्याची आस ! 

         ■ प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
             म्हसावद.ता.शहादा

बुधवार, जानेवारी २६, २०२२

भारत माझा महान


७३   वा   प्रजासत्ताक  दिवशी
करीतो मी  हुतात्म्यांना प्रणाम
दिले  तयांनी प्राणांचे बलिदान
केला स्वतंत्र  भारत देश महान

करीतो  मी  आज  दृढ  संकल्प
तिरंगा  तुझी   ठेवून   मी  साक्ष
पंचखंडात  मी  वाढविन  कीर्ती
दे आशिष भूमाते वंदन तुजला दशलक्ष !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...