Kaayguru.Marathi

बुधवार, डिसेंबर ०१, २०२१

साखरझोप


आज  पहाटे  साखरझोपेत !
एक  गोड  स्वप्न  मी पाहिले
प्रिये !  अमृतात  न्हाली   तू !
माझे   भाग्य    फळा   आले

आज स्वप्नसुंदरीचे भाळी मी
कुंकू माझ्या नावाचे लाविले!
प्रिये  !  मधाळलेल्या   देहाने
तू   समर्पित मजला जाहले !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१

संघर्ष माझा!


पराभव मी सहजच पचवून घेतो
मनात न ठेवता संयमाने जाहीर करतो !
लढेन  पण कधी  वाकणार नाही
संघर्षाला न  घाबरता तयारी मी करतो !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

अहो दाजी...!

अहो दाजी ! जाऊ नका हो लांब,
कशाला चाचपडता शिळी ती भाजी
बघा या झाडाला 
लगडले आंबे आले की पाडाला
रस चाखाया व्हा की तुम्ही राजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

आठवा भेट ती आपुली पहिली
रिमरिम सरी त्या ऋतू पावसाळी
नभी चमकली विज अवकाळी
कवेत येता तुमच्या झाले मी राजी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

मन झाले अधीर भेटाया हुरहूर
वाट पाहिन सायंकाळी नाक्यावर
घडता भेट तुमची आणि माझी
कशाला हवा दोघांत आपुल्या काझी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१

अंगाईगीत

अंगाईगीत

सजली रात्र चांदण्याच्या शालू नेसुनी
रातकिडे वाजवती पिपाणी
वारा   गातसे  मंजुळ गाणी
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

परसात निजली बाळा जाई जुई
जोजवण्या आली रातराणी ताई
सोबतीस तिच्या निद्रा राणी बाई
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

शेल चारोळी लेखन नियम

शेल चारोळी/काव्य रचना 
एका ओळीत मुळाक्षरांची [ अक्षरसंख्या] संख्या जी आहे तीच इतर ओळींमधे असायला हवी. .
✒️ लेखन नियम :-
अ ) लेखन चार ओळीतच असावे.ही शेल चारोळी म्हटली जाते.
ब ) चार-चार ओळींचे दोन,तीन,गट केल्यास ते शेलकाव्य म्हटले जाते.
१ ) ओळीत अक्षरसंख्या किती असावी.याला बंधन नाही.पण...मला वाटते दहा सोळा-सतरा अक्षरे योग्य ठरतात.
२ ) पहिल्या ओळीत आलेली अक्षरसंख्या ही उर्वरित तीनही ओळीत सारखीच असावी.म्हणजेच चारही ओळीत समान अक्षरसंख्या यावी.
३ ) शब्दसंख्येचे बंधन नाही.पण एक ते चार ओळीत अक्षरसंख्या समसमान असावी. 
४ ) पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीची सुरूवात असावा .
५) दुस-या ओळीच्या शेवटच्या शब्दाने तिसऱ्या ओळींची सुरुवात नसावी.
६ ) तिसरी ओळ स्वतंत्र सुरुवात असावी. 
७ ) तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दानेच चौथ्या ओळीची सुरुवात करावी.
८) यमक हे दुसऱ्या ओळीच्या शेवटी व चौथ्या ओळीच्या शेवटी जुळविला असावा.
९ ) चारही ओळी ह्या परस्परांना अर्थदृष्ट्या पुरक असाव्यात.
उदा. शेल चारोळी 

✒️ आपण दोघे 

सखी,ती वेळ पुन्हा परत यावी   [अक्षरे - १२]
यावी घेऊन पुन्हा त्या आठवणी [अक्षरे - १२]
आठवणींच्या झोक्यावर असावे [अक्षरे - १२]
असावे आपण दोघे नको भीती  [अक्षरे - १२]


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

उदा. शेलकाव्य
नात्याची विण
उसवू नको ग तू नात्याची विण   [अक्षरे - १२ ]
विण पुन्हा तशी जुळणार नाही   [अक्षरे - १२ ]
तू उगाच नको वाढवूस वाद.      [अक्षरे - १२ ]
वाद हा विनाशाचे कारण होई.   [अक्षरे - १२ ]

नाते मिळत नाही कुठे बाजारी    [अक्षरे - १२ ]
बाजारी नात्याला नसतेच नाव    [अक्षरे - १२ ]
विण असू द्यावी फिट्ट आणि घट्ट [अक्षरे - १२ ]
घट्ट विणीत नक्की गावतो गाव   [अक्षरे - १२ ]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...