Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

स्वच्छ भारत,समृद्ध भारत

स्वच्छ भारत 
चला रं... उठा रं... 
स्वच्छतेची शपथ घेऊ र्
मिळून सारे भारतीय आपण
भूमाता सुंदर करु र्

नरेंद्र मोदी साहेब र्
स्वतः हाती घेती झाडू र्
पाहून त्यांचे कार्य आपण
यशस्वी करु अभियान र्

कचरा राहता घरात र्
वाढते रोगराई र्
उचलून फेका कचरा बाहेर
जपा आपुले आरोग्य र्

गाव असो वा शाळा र्
टाकू नका तिथं कचरा र्
स्वच्छ राखू परिसर आपुला
पर्यावरण जपू या र्

ऐंका बापुची वाणी र्
तुम्ही सारे सुजाण र्
जिथे राही स्वच्छता 
देव तिथेचि वसतो र्

® प्रा.पुरूषोत्तम पटेल , म्हसावद

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

बायको नावाचं पुस्तक

बायको नावाचे पुस्तक (कविता )

मित्रहो,बायको...अत्यंत संवेदनशील विषय. " बायको " ही प्रत्येक नव-याची अंतर्मनाची प्रेमळ हाक आणि मदतीची साद असते.तिच्याविषयी प्रेमाच्या गोष्टी जशा हृदयात साठवतो न् आपण ; तशाच  कडू गोष्टीही आपल्याच हृदयात जतन कराव्यात.कोणाशीही हा " ओटीपी " कधीही शेअर करु नका.[हीच जाणीव बायकोने ही ठेवावी  !]


बायको नावाचं पुस्तक 
आजन्म जपावे मनात
संसारातील छोटी मोठी गोष्ट
निरंतर जपावी हृदयात

बायको नावाच्या पुस्तकांची
पाने फाडू नये चारचौघात
कडू असो वा गोड आठवण
निरंतर जपावी आपण हृदयात

असावी प्रेमळ अतिसुंदर
छबी नवरोबाच्या मनात
दोघांत दिसू नये कधी अंतर
दिसावी एकमेकांच्या हृदयात

दोघांची जोडी जणू शोभावी
लक्ष्मी-नारायण जनात
कणभरही संशयाला नसावी 
जागा नवरोबाच्या हृदयात

बायको स्रित्वाचे एक दैवी रुप
ती तर नवदुर्गा सप्तखंडात
प्रसन्न वागा प्रतिदिन तिच्याशी 
क्लेश ठेवू नये हृदयात

बायको म्हणजे संसाराची 
फुलणारी पुष्पलता सुगंधित
जपावा तिच्या शब्द नवरोबाने
गीता वेद समजून हृदयात !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

रुप-स्वरुप

रुप-स्वरुप (कविता)

शोना, क्षणभर पाहता तुला
तू माझा हृदयात केले घर
आता तर शक्यच नाही ग्
तुझ्याविना दूर राहणं क्षणभर

राणी सांगतो मी तुला ऐक !
क्षणात मनात ठसते ते रुप
विचारांना समजून घेऊन 
डोळ्यात साठते ते स्वरूप

प्रिये, तुझ्यासोबत ग् संचार
जीवनात भासे वसंतबहर
तुझ्या एक एक शब्द जणू 
श्वासात भरे संजिवक लहर

सखी,तू तर झाली ग् माझा
संसाराचा कणखर आधार
शब्दच सापडत नाही मला
कसे मानू मी तुझे आभार!

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

 

सुगरण

    सुगरण (कविता)
कधी शिकशील माणसा
सुगरणीची  तू  रे  कला
झाडावर  बांधीला  सुंदर
पिलांना  झुलता  बंगला

तिला  नाही   दोन  हात
ना  कोणी  रे  सोबतीला 
बघ   ईवलुश्या   चोचीने
खोपा   अविट   विणला

तिला   माहित  ना  माप
इंच   मिटर   अन्    फूट
बांधते  नाजूक  फांदीला
खोपा किती सुंदर अतूट

तीन   इंचाचा   हा  पक्षी
काडी  गुंफितो   दिसभर
पिला  आयुष्य   द्यावया
जीव   टांगतो  शेंड्यावर

मुठभरीचा  हा  रे  जीव
माया  ममतेला  चांगला
पिला  वाटते  ना  भिती
निजे बिनघोर खोप्याला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
          " पुष्प "

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

जागतिक अन्न दिवस

             आज दि.१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिवस
         आज १६ ऑक्टोबर... ' जागतिक अन्न दिवस '

संयुक्त राष्ट्रसंघाने १६ ऑक्टोबर १९४५ पासून हा दिवस
 ' जागतिक अन्न दिवस ' म्हणून निवड केली.
याच दशकात जगातील बहुसंख्य देश हे वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त /स्वतंत्र होऊ लागले होते.या देशांना विकासमार्गाची वाट चालतांना मुख्य अडचण होती " अन्न उपलब्धतेची ! " आणि हाच विधायक दृष्टिकोन ठेवून हा दिवस पालन करण्यास सुरुवात झाली.
  जगात २०२० पर्यंत कोणतीही व्यक्ती भुकेली राहणार नाही.यासाठी युएनए कडून #ZEROHUNGER
 ही एक मोहिम आखण्यात आली आहे.आजच्या दिनाच्या निमित्ताने आपणही त्यात योगदान देण्याचा संकल्प करु या !
💎 जागतिक अन्न दिवसाचे मुख्य उद्देश :-
१) जगभरातील भूक निर्मूलन कार्यासाठी जनप्रबोधन करणे.
२) उपासमारीने पिडीत लोकांसाठी अन्नसुरक्षा आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक स्तरावर जनप्रबोधन करणे.
३) " अन्न हा प्रत्येक मानवाचा मुलभूत अधिकार आहे " या बाबींवर लक्ष केंद्रित करणे.व प्रत्येकास अन्न पुरविणे.
 
💎 भूक संदर्भात विचार करता काही भयंकर मुद्दे समोर येतात.

१) सध्या जगभरात ६ कोटींहून अधिक लोक उपासमारीचे शिकार बनले आहेत.
२) दरवर्षी ४.५० लाख लोक भूक भागाााावी म्हणून दुषित अन्न सेवन करतात.त्यातच त्यांचे मृत्यू होतात.

 या दृष्टीने विचार करता २०२० ह्या वर्षी 
" वाढवा,पोषण करा,टिकाव धरता,एकत्र या![Grow,Nourish,Sustain, Together]" ही मध्यवर्ती कल्पना (थिम ) निश्चित केली होती.

💎 यंदा २०२१ ची थिम - 

" उद्या निरोगी,उद्या सुरक्षित अन्न ! "

 यानुसार विचार करता आपल्या देशात दर मिनिटाला कुपोषणामुळं दोन बळी जातात. घरात इन मीन तीन माणसं असतानाही नको तितकं स्वयंपाक करुन शिल्लक अन्न फेकून दिलं जातं. आपण हॉटेल मध्ये जेवायला जातो.तेव्हा पाहतो की,डिश मधले जितके खाल्ले जाते.त्याच्या पस्तीस ते चाळीस टक्के अन्न उष्टे म्हणून शिल्लक राहते.हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही.तसेच हॉटेलमधून पार्सल आणलं की घरातील पोळीभाजीकडं कोणी पाहतही नाही... अन्नाची ही अशी ‘ किंमत ’ केली जात आहे. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे ४० टक्के सडून / खाली सांडून वाया जातंय. त्यामुळं अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. 

💎 लग्न समारंभातील ​अक्षतांचा वापर

हिंदू वैदिक विवाह पद्धतीनुसार लग्नात ‘ वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची परंपरा आहे.एका अभ्यास पाहणीनूसार एका लग्नामध्ये सरासरी पाच किलो तांदूळ अक्षतासाठी वापरला जातो. त्यातील फक्त अर्धा किलो तांदूळ वधू-वरांच्या डोक्यावर पडतो. एकूण टाकलेल्या अक्षतांपैकी फक्त दहा टक्केच अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर पडतात.उर्वरित अक्षता आपल्या एकमेकांच्याच डोक्यावर पडतात,काहीवेळा डोळ्यात जातात.व ईजाही होते. अक्षता म्हणून टाकलेला व फेकलेला उर्वरित तांदूळ पायदळी तुडवला जातो. राज्यात सरासरी दीड लाख विवाह समारंभ होतात.त्यातून सुमारे सहा लाख किलो तांदळाची नासाडीच होते.हा तांदुळ वाचविण्यासाठी लग्नवेदीच्या ठिकाणी दोन मुली उभ्या केल्या व त्यांनी सर्वांच्या वतीने अक्षता टाकल्या तर केवळ शंभर दोनशे ग्रॅम अक्षता वापरून उर्वरीत तांदुळ वाचवता येईल.व त्या तांदुळामुळे दोनशे ते तिनशे लोकांची भूक भागविली जाईल.हाच विचार करून व परिस्थिती लक्षात घेऊन काही संस्था अक्षतांचे तांदूळ गोळा करून गरजू व्यक्तींना दान करतात.

💎 ​लग्नसोहळ्यातील अन्नाची नासाडी

सध्या परिस्थितीत लग्नसोहळ्यातील जेवणावळीचं स्वरुप बदलत आहे. आता पंगतीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफे जेवणानं घेतली आहे. ही पद्धतही काही वाईट नाही. मात्र रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात.पूर्ण न खाता ताटातुट उष्टे शिल्लक राहते.व ते कचरा कुंडीत तसेच फेकून दिले जाते. या प्रकारामुळं अन्नाची डोळ्यांदेखत नासाडी होत आहे. त्यापेक्षा हवे ते पदार्थ,हवे तितकेच घेऊन " अन्न हे पुर्णब्रम्ह " हा विचार केला तर अन्नाची नासाडी टळेल. उरलेलं अन्न गरजूंना वाटता येईल.

💎 पंगतीत आग्रहाने जेवण वाढणे 

आमच्या भागात अनेक लग्न समारंभात ,कार्यकमाप्रसंगी दिड दोन हजार लोकांची एकच पंगत बसविली जाते.त्यात खास अतिथींना,व-हाडींना, व्याही मंडळींना खास आग्रह करुन " नको ,नको, म्हणतानाही " वाढलं जात.ते खाल्ले न गेल्याने पत्रावळीवर शिल्लक राहते.व उष्टे आणि वाया म्हणून फेकून दिले जाते.हा अनावश्यक खर्च सद्विवेक बुद्धीने टाळता येईल.व अन्नाची नासाडी थांबवता येईल.

💎 ​विविध उपक्रम

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तरुण समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्था यांनी पुढे यावे. संस्था, समाजसेवक ,यांनी जनप्रबोधन करावे.लग्नसमारंभ,कार्यक्रमातील, हॉटेल्समधलं उरलेलं अन्न मिळवावे आणि भुकेल्या गरिबांमध्ये त्याचे वाटप करावे. यामुळं शिजवलेलं अन्न वाया जाणार नाही ते गरजू व्यक्तींच्या मुखात पडेल.व भूक शमविल्याचे आशीर्वाद घेता येईल.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...