सखे...ओळखायला शिक तू
जनमाणसांचे उधळलेले रंग
संशयाचे काढून फेक पोपडे
हर्ष येईल दारी टळेल प्रीतभंग
सखे...ओळखायला शिक तू
तानापिहिनीपांजा रंगाचे धर्म
कोणीही चोरी करु शकत नाही
तुझे माझे गोड प्रेमळ वर्म !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सखे...ओळखायला शिक तू
सखे...ओळखायला शिक तू
तानापिहिनीपांजा रंगाचे धर्म
कोणीही चोरी करु शकत नाही
तुझे माझे गोड प्रेमळ वर्म !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
करावा लागला न् संघर्ष तरी
तरी तसूभर हटनार नाही
मी संघर्षात नवी वाट शोधेन
शोधेन असे मी भव्य-दिव्य काही
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
धुके...
निराशेचे विरत गेले
मातीशी इमान राखून
ध्येय शिखर नजिक आले
धुके...
संकटाचे विरत गेले
मनाच्या विशाल आभाळी
शरदाचे चांदणे शिंपीत गेले
धुके...
क्लेशाचे विरत गेले
माणूस एकाच देवाची लेकूरे
प्रीतिने सकल मेळवावे
धुके...
संशयाचे विरत गेले
प्रसन्न परिमळ पहाटे
प्राजक्त श्वासात भरुन गेले
धुके...
अपयशाचे विरत गेले
जणू रविकिरणांच्या स्पर्श होता
मुखकमल प्रसन्न फुलले
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
धुके...
निराशेचे विरत गेले
मातीशी इमान राखून
ध्येय शिखर नजिक आले
धुके...
संकटाचे विरत गेले
मनाच्या विशाल आभाळी
शरदाचे चांदणे शिंपीत गेले
धुके...
क्लेशाचे विरत गेले
माणूस एकाच देवाची लेकूरे
प्रीतिने सकल मेळवावे
धुके...
संशयाचे विरत गेले
प्रसन्न परिमळ पहाटे
प्राजक्त श्वासात भरुन गेले
धुके...
अपयशाचे विरत गेले
जणू रविकिरणांच्या स्पर्श होता
मुखकमल प्रसन्न फुलले
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
" शिरोमणी काव्य रचना' ’ हा एक शब्दाधारीत काव्य प्रकार आहे. हा फारच सुंदर आणि मनाला भावणारा काव्यप्रकार आहे. काही जण याला " काव्य शिरोमणी " असेही म्हणतात.
१) या काव्यात प्रत्येक कडवे चार ओळींचे असते.
२) चार ओळीत दहा शब्दांची खालील प्रमाणे विभागणी असते.....
पहिल्या ओळीत एक शब्द,
दुसऱ्या ओळीत दोन शब्द
तिसऱ्या ओळीत तीन शब्द आणि
चवथ्या ओळीत चार शब्द
अशी एकूण दहा शब्दांची मांडणी असते.
३) एका विशिष्ट गोष्टीभोवती या काव्याची पूर्ण वीण गुंफलेली असते. हा शब्द प्रत्येक कडव्यात पहील्या ओळीत स्थायी असतो. म्हणूनच कदाचित या काव्यप्रकाराला शिरोमणी हे नाव पडले असावे. बाकीच्या तीन ओळीत त्याचे गुणवर्णन अथवा सकारात्मक किंवा नकारात्मक भाव दर्शविलेले असतात.
४) प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या-चौथ्या किंवा तिसऱ्या-चौथ्या ओळीत यमक जुळलेले असावे.
५) कडवी किती असावी, याला मर्यादा नाही.
-: माझी स्वरचित शिरोमणी काव्य रचना :-
राग
असतो वाईट
लागू नये नादी
करतो तो जीवनाची बर्बादी
राग
नसे चांगला
करु नये जवळ
नष्ट करीतो जगण्याचे बळ
राग
ठेवा नियंत्रित
सोडू नये मुक्त
देहाचे प्रतिक्षण आटवी रक्त
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...