Kaayguru.Marathi

बुधवार, नोव्हेंबर ०३, २०२१

संस्कार

संस्कार
          संस्कार. ... प्रत्येकाच्या जीवनवेलीवर उमलणारे अप्रतिम पुष्प ! पुष्प जसे सुगंधित वासाचे आणि बिनसुगंधित वासाचे असे दोन प्रकारचे असतात, तसे संस्काराचे देखील आपणास दोन प्रकार सांगता येतील.
 १) पवित्र-आदर्श संस्कार आणि 
 २) कुसंस्कार; हा विघाशक विघातक  संस्कार होय.
          अयोध्यापती श्रीरामचंद्रजी यांचावर जे संस्कार झाले ते पवित्र व आदर्श होत. विनम्रता, सहिष्णुता, प्रजाहितदक्षता,मातृ-पितृभाव,गुरूज्ञाचे पालन,
कुटुंबवत्सलता,परस्त्रीला माता मानणे,पित्रृज्ञेचे पालन, एकपत्नीभाव,सज्जनाचे रक्षण, दृष्टांचे निर्दालन, बंधूभाव त्याग व इतराप्रति समर्पण ,बाहूबलाचा समाज संघटनेसाठी उपयोग इ.संस्कार झाले.त्यातून त्यांची प्रतिमा व वर्तन समाजाला ललामभूत ठरली.हजारो वर्षे झाली आहेत तरी श्रीरामप्रभुजी आपणास वरील संस्कारामुळे आदर्श ठरतात.
हीच गोष्ट छत्रपती शिवाजी राजेबाबत म्हणता येईल.आजही ते अखील मानव विश्वाला आदर्श वाटतात.
     तर दुसरीकडे रावणासारख्या महापराक्रमी ,शिवभक्त, वेदांच्या सर्वश्रेष्ठ व्यासंगी, शुरविर असा त्याचा सप्तखंडात सर्वदूर लौकिक होता. पण.... रावणाकडे प्रचंड सामर्थ्य असूनही त्याला या सर्वाचा उपयोग स्वत:च्या विषयवासनेपलीकडे जाऊन करता आलेच नाही. कारण गम्य ते गेले तरी दुसरे गम्य ते प्राप्त करणे.हे रावणाचे ध्येय असे.हे संस्कार त्याचावर माता कैकसीच्या वाणी-वर्तनातून कोरले गेले होते. हे लक्षात घ्यावे लागेल. हीच गोष्ट मुघल सम्य्रा औरंगजेब याांच्याबाबत सांगता येईल. 
याउलट श्रीरामप्रभुंनी विषयापलीकडे जाऊन निर्णय घेतला. मग तो पितृआज्ञेतून मिळालेला चौदा वर्षांच्या वनवासही सहज स्विकारला.हा संस्कार मुलाचे पित्यावरील अलौकिक प्रेम सिध्द करतो.रावणाच्या आयुष्यात त्यांस असा आदेश झाला असता तर त्याने आदेश करणारा व हट्ट धरणा-या या दोहोंच्या जागीच तत्क्षणी शिरच्छेद केला असता. या सर्व गोष्टी संस्कारावरच ठरतात. यापैकी एक श्रीरामप्रभु हे
 " रघूकुल रीत सदा चली आयी
     प्राण जाय पर वचन ना जाई "
अशा संस्कारात वाढत होते. तर रावण हा
  " त्रिखंड मे मेरे जैसा बडा ना कोई " या संस्कारात वाढत राहीला.शेवटी या कुसंस्कारानी रावणाच्या   नाश ओढवला.
संपूर्ण कुटुंबासह लंकेचा विनाश ओढवला.
     
प्रा.पुरूषोत्तम पटेल, उपप्राचार्य,म्हसावद, भ्रमणध्वनी-9421530412

मंगळवार, नोव्हेंबर ०२, २०२१

धनत्रयोदशी

                ✍️ धनत्रयोदशी 🪔🙏

दिवाळी सण-उत्सवातील धनत्रयोदशी म्हणजे आश्विन पंधरवड्यातील तेरावा दिवस.आश्विन महिन्यातील दुस-या पंधरवड्यातील आश्विन ।। कृ।। त्रयोदशीचा हा मंगलमय दिवस.
" धनत्रयोदशी " या शब्दांत सहा अक्षरे आहेत.प्रत्येक अक्षर एक नैतिक मूल्य शिकवून जाते.या दिवसाचे शब्दमय पावन महत्व ✍️ 

✒️ - धर्माचरण ( धर्माने आचरण करणे )
✒️ - नम्राचरण ( विनम्रतेने वागणे )
✒️त्र - त्रपाचरण ( ऋग्वेद, यजुर्वेद,
             सामवेदानुसार आचरण करणे.)
✒️यो - योगाचरण ( आठ नियम व त्यातील
             " योग " नियमाचे पालन)
✒️  - दयाचरण. ( सर्वांभूती दयाभाव राखणे )
✒️शी - शीताचरण ( शांत राहणे व क्रोध न करणे.)

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

घडवू देश नवा

घडवू देश नवा *
स्वच्छतेची शपथ घेऊ या 
नवा भारत  देश घडवू या
चारही  बाजू  स्वच्छ  ठेऊ 
कचरा उचलून फेकू या || धृ. ||
        ओला कचरा सुका कचरा
        वेगवेगळा  टाकू  चला
        त्यावरती  संस्कार करुनि 
        उज्ज्वल भारत घडवू या ||१||
शौचास जाता बाहेर 
उघड्यावर बसणे टाळू या
शौचालय बांधून आपण
गाव हागणदारीमुक्त करु या || २||
        घर असू द्या भुवन
        गाव बनवू नंदनवन
        स्वच्छ ठेवा तन-मन आपुले 
        संकल्प आपण करुया ||३||

©प्रा. पुरुषोत्तम पटेल, उपमुख्याध्यापक 
कुबेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसावद,
ता. शहादा, जि.नंदुरबार. 
mhasawad.blogspot.in

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

दिपावली

ही दिपावली आपणास सुखाची, समाधानाची,
समृद्धीची,आनंदाची, भरभराटीची,व समस्त
इच्छापूर्तीचा आनंद देणारी ठरो!ही शुभेच्छा!
🪔🪔🪔🪔🪔🎇🎆🪔🪔🪔🪔🪔

     दिपावली (कविता)

महालक्ष्मी देवी मी नमितो
आद्य वंदन चरणी तुजला 
लावितो दिपावली ज्योती
आई !आशिष दे तू मजला ।।१।।

पसरु   दे अखिल संसारी 
लखलख     चंदेरी आनंद
विश्वाचे   दुःख दूर कराया
मनी लागू दे छंद मजला ।।२।।
महालक्ष्मी देवी मी नमितो
...आई, आशिष दे मजला

दे   सद्बुद्धी   जळो  क्लेश
मनामनात  जुळू  दे नाते !
दुष्प्रवृत्ती, दृष्टभाव  हरोनी
नीति,सूमती किर्ती सकला।।३।।
महालक्ष्मी देवी मी नमितो
...आई, आशिष दे मजला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

प्रियदर्शिनी इंदिराजी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान 
स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची आज पुण्यतिथी:
 शब्दसुमनांनी श्रद्धांजली 🌹🙏
✍️ इंदिराजी गांधी

कमला   जवाहरांची  इंदू
अटलजींच्या  दुर्गेचा मान
मोरारजींची   गुंगी गुडिया 
गौरवग्रंथी स्तुतीसुमनांचे पान 
करितो कोटी कोटी प्रणाम. १

बालपणी निर्मिली वानरसेना 
मुक्त  कराया  भारत   देशा 
केली जुलमी इंग्रजाची दैना
भोगीयलास तूम्ही कारावासा
करितो कोटी कोटी प्रणाम. २

बलाढ्य भारत सिद्ध कराया
तुझसी आवडे  विज्ञानक्रांती 
जगी  निःशस्त्रीकरण प्रणेता 
ध्यास  मनी   तव  विश्वशांती 
करितो  कोटी  कोटी  प्रणाम. ३

कणखर   नेता  विश्ववंदिता 
आद्य  हो महिला पंतप्रधान 
आत्मबळे एक्कात्तरचे समरी 
पाकचे  गळविले  देह -भान 
करितो  कोटी कोटी प्रणाम. ४

कथनी  अन् करणी यात 
कधी ना  केला तूम्ही भेद 
कर्तृत्व तुमचे महान एवढे
कोणी   ना  करीला   छेद
करितो कोटी कोटी प्रणाम. ५

श्वासात जनविकास ध्यास 
तुमचे जाणे एक विरमरण
भारतरत्न !  इंदिराजी.. .
हे तर... मातृभूमिस समर्पण 
तुम्हा कोटी कोटी वंदन ! ६

तुम्ही तर मुत्सद्दी आदि अंती 
जगी जन्म नसे कोणी दूजा
तुमच्या दृढसंकल्पा पुढती
उंच हिमगिरी वाटे हो खूजा
करितो कोटी कोटी प्रणाम! ७

© शब्दसौदर्य :-
प्रा.श्री.पुरूषोत्तम पटेल

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...