जिथे नीतिला मिळत नाही गती
शब्दांची जिथे वाटत नाही भीती
राजकारण…
गल्ली ते दिल्ली सतत चालत राहते
मिडीयात अग्रस्थानी जाऊन बसते
राजकारण…
रक्त नात्यात दुरावा निर्माण करते
स्वार्थी पोळी सतत भाजत रहाते
राजकारण…
क्षणोक्षणी करते शब्दांची चिरफाड
दिल्या वचनांची ठेवत नाही चाड
राजकारण…
रातोरात रंकाचा राव करुन देई
रावालाही रातोरात रंक करील
राजकारण…
खुर्चीसाठी सतराशे साठ उड्या
मतदारांना देते भूलथापांचा पुड्या
राजकारण…
आज या पक्षात उद्या त्या पक्षात
मर्यादा सोडून वागते जनमानसात
राजकारण…
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा