अरे पाऊसा तू असा रे कसा
जरा ठेव की दया - माया
वर्षभरी येतो अवकाळी
शेतकऱ्यांची लुटतो तू रया
करीतो रे मी तुला विनवणी
येऊ दे ना रे तू करुणा
हसू दे की रे शेतशिवार
थांबव बळी राजाची दैना
तू आणितो संकट आस्मानी
मायबाप सरकार सुलतानी
कुणा रडावे कुणा आळवावे
कोरडे डोळ्यातील पाणी
चार मास तुला दिले देवाने
हसत खेळत सृष्टीस भेटावे
नको होऊ रे तू वेडाखूळा
आठ मास शांत झोपावे
ऐक अगदी साधी अन् सोपी
सांगतो गड्याऽऽ तुज युक्ती
सुखी नांदू दे हिवाळा-उन्हाळा
थांबव तुझ्या नसत्या उचापती
तू लेकीच्या मायेने भेटी यावे
सृष्टी मातेस प्रेमभरे भेटावे
घडीभरी करुन गुजगोष्टी
हर्ष आनंदें निरोप तू घ्यावे !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खरंय अगदी अवकाळी पावसामुळे शेतकरी पार मोडला.वास्तव मांडले ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावाह.... खुपच सुंदर रचना अप्रतिम.... 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाखुपच छान आर्जव केली आहे पावसाकडे...
अप्रतिम रचना केली सर 👌👌👌
उत्तर द्याहटवावास्तवदर्शी व प्रासंगीक, खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी ,अप्रतीम रचना...🥺👌👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम👌
उत्तर द्याहटवाSuper
उत्तर द्याहटवावास्तविकता
उत्तर द्याहटवावास्तविकता 🥺👌
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवाकैफियत छान मांडली परंतु पर्यावरणाचा विचार केला तर ही अवकळा
उत्तर द्याहटवाजागतिक तापमान वाढीमुळे आली
विजय बोरदे
अतिशय सुंदर वास्तविकता मांडली सर जी..👍👌👌👌💐
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर वास्तविकता मांडली आहे सर..खूप छानच👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर,,,
उत्तर द्याहटवा