Kaayguru.Marathi

शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

भाग्यवंत मी ![ शेल चारोळी]


कदाचित का? मी तर आहेच भाग्यवंत
भाग्यवंत  मी  उष:काली  भेटे  भगवंत
सूर्य - किरणात  दिसे मज प्रेमळ   हात
हात  घेऊन  हाती चालतो मी नसे खंत

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

ती भावना! [ हायकू ]

भावना तिची
बेईमान नव्हती
कळली हो ती

दखल तिची
घेतली मी कधीची
उदात्ततेची !

प्रीत वेडी ती
हृदयी केली घट्ट
तिच्या तो हट्ट !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल
  " पुष्प "

गुरुवार, डिसेंबर ०२, २०२१

२ डिसेंबर :जागतिक गुलामगिरी मुक्तता दिवस !

 २ डिसेंबर :जागतिक गुलामगिरी मुक्तता दिवस !
२ डिसेंबर १९४९ साली संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची घोषणा करून, कुठल्याही स्वरूपाच्या गुलामगिरीचे जगभरातून उच्चाटन व्हावे म्हणून आवाहन केले होते. त्यानंतर २००२ हे साल आंतरराष्ट्रीय वर्ष या कार्याची स्मृती म्हणून जाहीर झाले होते.
     गुलामगिरी हा संघटित गुन्हा आहे व जगभरात त्याचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न, पूर्वकाळापासून होत आले आहेत. हे विसरुन चालणार नाही.पण, ही प्रथा काही देशात-समाजांत निर्धोकपणे सुरु होती.हेही नाकारता येत नाही.
" गुलामगिरी ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत असून ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाची तरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे ' गुलामगिरी ' किंवा ' गुलामी ' अशी संज्ञा आहे. "
गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असते. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा तसेच कामासाठी मोबदला मागण्याचाही अधिकार त्यांना नसतो.त्यांना ' मानवी हक्क ' नाकारले जातात. अलीकडील काळात जगभरातील बहुतांश ठिकाणी तसं च आपल्या भारतातही गुलामगिरीला कायद्यानेच बंदी घातली असली तरी बेकायदा ती काही स्वरूपात चालू आहेच हे भयावह सत्य आहे.ते म्हणजे-
१) भूकेले व आर्थिक दृष्ट्या गरीब व दरिद्री मुली- मुलांना विविध आमिषांना बळी पाडून त्यांचे अपहरण करणे.
२) गरजू स्त्रियां व पुरुषांच्या व्यापार करून, त्यांना कष्टांच्या कामाला जुंपणे.
३) अल्पवयीन मुली,तरुणी, स्त्रिया यांना लैंगिक भूका भागविण्याच्या कामाला विकणे, वापरणे, जबरदस्ती करून त्यांच्याकडून विविध नीच दर्जाची अमानवीय कामे करवून घेणे.
ही गुलामगिरीची नवी आधुनिक आवृत्ती होय.
    २ डिसेंबर २००९ च्या संदेशात युनोचे सरचिटणीस बान की मून म्हणाले होते त्यानुसार, 
" गुलामगिरीचे उच्चाटन केवळ कायद्याने होणार नाही. या मोहिमेत गरिबी हटाव, साक्षरता प्रसार, लैंगिक समानता, हिंसेचे उच्चाटन हे कार्यक्रमदेखील अंतर्भूत व्हायला हवेत."
आज ' जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन ' आहे.आजच्या दिवशी आपण गुलामगिरीला विरोध करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. स्त्रिया, पुरुष व लहानग्यांना जबरदस्तीने गुलाम बनवून त्यांच्याकडून काम करवून घेणे हा गुन्हा आहे.हे समाजाला पटवून देणे आवश्यक आहे.आपण ' आधी मी गुलामगिरी नाकारली, मानवता जोपासली.हे तत्व स्वतः स्विकारु या!' चला तर गुलामगिरीविरोधातील आवाज लोकांपर्यंत पोहचवूया! आजच्या दिवशी हे प्रण घेऊया, त्यांनाही त्यांचे हक्क मिळवून देऊया !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


अवकाळी पाऊस

अरे पाऊसा तू असा रे कसा
जरा   ठेव  की दया - माया
वर्षभरी    येतो   अवकाळी
शेतकऱ्यांची  लुटतो  तू  रया

करीतो रे मी तुला विनवणी
येऊ  दे  ना  रे  तू   करुणा
हसू  दे  की   रे   शेतशिवार
थांबव   बळी  राजाची  दैना

तू आणितो संकट आस्मानी
मायबाप सरकार सुलतानी
कुणा रडावे कुणा आळवावे
कोरडे   डोळ्यातील   पाणी

चार  मास  तुला दिले देवाने
हसत  खेळत सृष्टीस भेटावे
नको  होऊ  रे  तू  वेडाखूळा
आठ   मास    शांत  झोपावे

ऐक अगदी साधी अन् सोपी 
सांगतो  गड्याऽऽ तुज  युक्ती
सुखी नांदू दे हिवाळा-उन्हाळा
थांबव तुझ्या नसत्या उचापती

तू लेकीच्या मायेने भेटी यावे
सृष्टी  मातेस   प्रेमभरे भेटावे
घडीभरी   करुन   गुजगोष्टी
हर्ष  आनंदें   निरोप  तू घ्यावे !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, डिसेंबर ०१, २०२१

साखरझोप


आज  पहाटे  साखरझोपेत !
एक  गोड  स्वप्न  मी पाहिले
प्रिये !  अमृतात  न्हाली   तू !
माझे   भाग्य    फळा   आले

आज स्वप्नसुंदरीचे भाळी मी
कुंकू माझ्या नावाचे लाविले!
प्रिये  !  मधाळलेल्या   देहाने
तू   समर्पित मजला जाहले !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...