✍️
अष्टाक्षरी काव्य लेखन रचना नियम✍️ अष्टाक्षरी काव्यलेखन हा खूप सुंदर असा काव्यलेखन प्रकार आहे.
✍️ प्रामुख्याने आद्य स्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या बहुसंख्य कविता अष्टाक्षरी काव्यलेखन प्रकारात मोडतात.
✍️ अष्टाक्षरी काव्य हा गेय काव्य प्रकार आहे.हा त्याचा महत्वाचा विशेष.
उदा.१)
अरे खोप्यामधी खोपा । सुगरणीचा चांगला ।
देखा पिलासाठी तिनं।झोका झाडाले टांगला।।१।।
पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला।।२।।
© बहिणाबाई चौधरी
२) ज्योतिबांना नमस्कार मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हा देई आशा जीवन देतसे।।१।।
थोर जोति दीन शूद्रा अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई ती आम्हाला उद्धरी।।२।।
© सावित्रीबाई फुले
३) देवा श्री करुणाकरा.
महादेवा गौरीहरा
तुज नमितो दयाळा
यावे दर्शना सत्वरा ।।१।।
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
✍️लेखन नियम :
१) प्रत्येक कडवे हे आठ अक्षरांचे असावे.
२) कडवे हे दोन ओळींचे असले तर त्यातील पहिला गट हा आठ अक्षरांचा आणि दुसरा गट आठ अक्षरांचा असे एकूण १६ अक्षरे असतील. उदा.सावित्रिबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी यांची रचना पहा.
३) रचना चरणात असली तर प्रत्येक चरण(चारओळी)
आठच अक्षरांचेच असावे.
४) आठपेक्षा कमी वा आठपेक्षा जास्त अक्षरे नकोत.
४) रचनेतील प्रत्येक शब्दाचा आरंभ हा दोन,चार, सहा अशा सम शब्दांतच करावा.
५) आरंभ हा एकाक्षरी,तीनाक्षरी,पंचाक्षरी शब्दांत करणे टाळावे.ते नियमात बसत नाही.
६) चरणात दुस-या व चौथ्या ओळीत शेवटच्या शब्दांत स्वरयमक असावाच!
उदा. 💎 गर्व शब्दाला सर्व असा स्वरयमक.
💎 वाणी शब्दाला गाणी असा स्वरयमक.
✍️ चला तर.करा मग अष्टाक्षरी लेखनाचा श्रीगणेशा!
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "